साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा - धनंजय मुंडे


मुंबई (दि. ३१) - : २०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या एक ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून साजरी करावी असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.
परंतु जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या सर्व संकल्पनाना बंधन घातलं आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

आपण सर्व जण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे अनुयायी म्हणून, आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षीची जयंती घरच्या घरीच अण्णाभाउंच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करू. कुठेही कोरोनाविषयक नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना अभिवादन करावे असे ना. मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्व संध्येला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर