अमृत अटल पाणी योजना,व ड्रेनेज योजना केवळ गबाड़ लाटण्यासाठी - डॉ नितिन सोनवणे. बीड न.प.ची बोगस गिरी
बीड (प्रतिनिधी) दि.25 -: बीड शहरातील अजची परिस्थिती असी आहे की जनतेला चालण्यासाठी रस्ते चांगले नाहीत जे होते ते ड्रेनेज निर्मिती करण्या साठी खोडून काढले आहेत चालताना चिखल, खड़े, पानी यातून मार्ग शोधत चालावे लागते. वयोवृद्ध व मुले घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत केवळ ड्रेनेज च्या नावांवर निष्क्रिय काम करून करोडो रुपए लाटले असेच म्हणावे लागेल, तलाव पूर्ण भरलेले असताना केवळ लाइट बिल थकित असल्या कारनाणे नळाला 15-15 दिवस पाणी सोडले जात नाही हे असे आहे, अमृत अटल योजना राबविली खरी पण पाणी त्याच्यात येईल का ?
हा प्रश्ण पडला आहे पाण्याच्या नावांवर हवा वाट्याला येईल असेच दिसत आहे. कोरोना साठी उपाय योजना राबविण्यात यायला हव्यात नगरपालिका दवाखने मध्ये योग्य सुविधा उपलब्ध करून रुग्णांसाठी बरेच करण्या सारखे आहे, ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यासाठी उपाय योजना नाहीत अश्या परिस्थिति मध्ये सुसज्य गार्डन करोडो रुपए खर्च करायचे हे काही जनतेला पटनार नाही. भर लॉकडाऊन मध्ये रस्त्यावरील खांब्यांवर लाईट नव्हते अत्ता ही बर्याच ठिकाणी नाहीत आणि तिकडे सूशोभिकरन साठी किती तरी लाइट जाळायची पटेल का कोणाला? आज संचारबंदी आहे, फिजिकल डिसटंन्स पाळायची आहे पुढे किती दिवस आणखीन पाळावी लागणार आहे माहीत नाही आणि उद्यान बांधुन काय लोक जमा करणार की काय ?हाच मोठा प्रश्न जनते पुढे पडला आहे.डॉ नितिन सोनवणे बीड वंचित बहुजन आघाडी नेते तथा
निरीक्षक औरंगाबाद व जालना यांनी एका पत्रका द्वारे केली आहे.
Comments
Post a Comment