माजी IAS नीला सत्यनारायण यांचे निधन


 राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज दुःखद निधन झाले, एक चांगल्या प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्व पूर्ण निर्णय घेतले होते. सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड करण्यात आली होती. त्या खूप चांगल्या लेखिका, गीतकार, साहित्यकार होत्या. भरतनाट्यमशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता. सुफी संगीत  तसेच भरत नाट्यमचे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. मी पत्रकार, व्यावसायिक नाट्य, चित्रपट  क्षेत्रातील असल्याने माझे त्यांच्याशी अनेकदा भेटी होत असे, एकदा त्यांनी सुफी संगीताच्या ऑडियो cd मला दिल्या होत्या. वरळी सेंटर मध्ये एकदा त्यांच्या कार्यक्रमानिमित्त झालेली भेट ही शेवटची ठरली. त्यांना संगीताची खूप आवड होती, त्यांच्या अचानक जाण्याने संगीत, साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली. वंचित बहुजन आघाडी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला