Posts

Showing posts from June, 2020

चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे

Image
बीड,(प्रतिनिधी) दि.30:- जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे आलेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते यातील उर्वरित आपद्ग्रस्त बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने 71 कोटी 88 लक्ष  हजार रूपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये "क्यार" व "महा" चक्रीवादळच्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने या शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ७३०९ कोटी ३६ लाख रूपये निधी यापूर्वी देखील वितरित केला आहे. दूसऱ्या टप्प्यात उर्वरित बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपासाठी शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.  औरंगाबाद विभागास 249 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यापैकी बीड जिल्ह्यास सर्वात जास्त 71 कोटी रुपये मिळाले आहेत.  हा निधी शेत

परळी ते मलकापूर मार्गे मरळवाडी मांडवा रस्ता चिखलय, रस्ता तात्काळ दुरुस्त करावा-भास्कर गित्ते

Image
परळी वै. (प्रतिनिधी) :- परळी शहरातून जाणाऱ्या परळी, मलकापूर, मरळवाडी ते.मांडवा रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डेच खड्डे व माळावरून वाहुन येणाऱ्या पाणी रस्त्यावर उतरून वाहुन. आलेल्या गाळामुळे सर्वत्र चिखलमय झाले आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भास्कर गित्ते यांनी केली आहे.                 परळी, मलकापूर, मरळवाडी ते मांडवा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची रहदारी आहे. मलकापूर जवळ डोंगर भाग असल्यामुळे पावस पडला की पाणी रस्त्यावर उतरून सर्वत्र गुडघेइतक्या चिखल होत आहे. तसेच रस्त्यावर साचत असलेले. पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकीला चिखल अडकून बसत आहे. तर काही दुचाकी वरून पडुन जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात चिखलमय झाल्यामुळे दुचाकीधारक सिलिप होण्याची घटना वाढत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात तर ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रात्री बेरात्री एखाद्या सिलीप.होऊन पडला तर व.कुणी नाही उचलल्यास मोठा अर्नथ होण्याची शक्यता आहे. परळी,

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: लॉकडाऊन  मध्ये वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, येथील संवर्धन केलेली जवळपास दोन लक्ष झाडे हिरवाईने बहरली. वन व समाजिक  वनीकरण विभागाच्यावतीने परळी व परीसरात वसंतनगर, कन्हेरवाडी, रेल्वे स्टेशन येथील डेन्स फॉरेस्ट तसेच आनंदधाम व मालेवाडी परीसरासह जवळपास दोन लक्ष झाडांची लागवड व संवर्धन केल्याने उजाड माळरान हिरवाईने बहरले असून देशी विदेशी प्रजातींच्या वृक्षवल्लीमुळे हे डोंगरमाथे पर्यटन स्थळ बनत आहेत. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर शासकिय योजना फलदायी होते. प्रादेशिक वनीकरण व सामाजिक वनीकरण विभागाच्या परळी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची योजना हाती घेतली. डोंगरमाथ्यावरील दगडगोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमिनीवर आतापर्यंत फक्त पावसाळ्यात खुरटे गवत उगवायचे त्या माळरानावर वृक्षलागवड योजनेतून वसंतनगर,कन्हेरवाडी,रेवली,व परळी रेल्वे स्टेशन याठिकाणी हेक्टरवर 30 हजार झाडांची  लागवड करीत संगोपन केल्याने हे डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत. तालुक्यात वनविभागाची शेकडो हेक्टर जमिन आहे.दगडगोट्यांनी व्यापलेल्या या खडकाळ जमिनीवर फक्त पावसाळ्यात गवत असते. बाकी 

लॉकडाऊनचा कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश कायम जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Image
बीड, (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ जुलै २०२० रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून  त्यानुसार जिल्हयात दिनांक ३१ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.  त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत कायम राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.     यापूर्वी आदेशानुसार जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या कालावधीत  ३१ जुलै २०२० पर्यत वाढ झाली आहे.      राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  1897 खंड 2 , 3 व 4 नुसार  13 मार्च 2020 पासून प्रतिबंध लागू केले आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

परळी शहर काँग्रेसचे आंदोलन धुमधडाक्यात यशस्वी बाबुभाई नंबर दार

Image
परळी (प्रतिनिधी) -: पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालय समोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारने इंधन दरवाढ पेट्रोल-डिझेलची केल्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण वाढला असून पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते  वसंतराव मुंडे यांनी धरणे आंदोलनात केली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बी बियाणे खते औषधी खूप मोठ्या प्रमाणावर राज आश्रयाने अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आहेत ते निकृष्ट असून बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे महाराष्ट्र सरकार कोरोना रोगाच्या लॉक डाउन मध्ये स्वस्त धान्य दुकान दारांना मोफत धान्य वाटप गोरगरीब जनतेला करण्यासाठी शासनाकडून दिले परंतु ते नियमाप्रमाणे जनतेपर्यंत पोहोचले नाही याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसे निवेदन मा तहसीलदार परळी वैजनाथ जिल्हा बीड मार्फत मा राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजग

दिव्य मराठी विरोधातील गुन्हे मागे घ्यापरळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन

Image
परळी (प्रतिनिधी) -: औरंगाबाद  येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने  दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी  पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे  केली आहे.   औरंगाबाद महानगर भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत.प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तहसिलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते,शहराध्यक्ष संभाजी

शाळा, महाविद्यालयांच्या शुल्कामध्ये सवलत द्या, 'एसआयओ' ची मागणी

Image
मुंबई (प्रतिनिधी) -: कोविड -19 चा प्रादुर्भाव आणि शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बरेच लोक नोकरीविना आहेत, तर इतरांना वेतन कपातीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत, बर्‍याच पालकांना त्यांच्या मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयाच्या शुल्कासह काही नियमित खर्च भागविणे फार कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) ने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षण शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन आणि शुल्क नियामक प्राधिकरण लिहिलेल्या एका पत्रात 'एसआयओ' ने सुचवले आहे की ज्या महिन्यांत प्रत्यक्ष वर्ग भरत नाहीत त्या महिन्यांतील सर्व शाळांचे शुल्क 30% कमी केले पाहिजे. तसेच मागील वर्षाच्या शुल्काच्या तुलनेत सर्व उच्च, तांत्रिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांचे वार्षिक शुल्क 15% कमी केले जाणे आवश्यक आहे. तथापि, शाळा व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांना कायम राखून त्यांच्या पगाराची मिळकत चालू ठेवावी हे सरकारने निश्चित केले पाहिजे, अशी मागणी ही संघटनेने केली आहे. समाजाच्या विकासासाठी शिक्षण ही अत्यावश्यक गरज आहे. म्हणूनच सध्याचे

सरकारी दडपशाही थांबवा, अन्यथा असंतोषाला तोंड द्यावे लागेल - सिद्धार्थ मोकळे

Image
मुंबई (प्रतिनिधी)  दि. २९ -: राज्यात सातत्याने जातीय अत्याचाराच्या घटना घडत असून सरकार आणि पोलीस यंत्रणा पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एफआयआर नोंदवण्यात दिरंगाई करण्यापासून ते पुरावे नष्ट करण्यास वाव देणे, चुकीचे जबाब नोंदवणे, आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करणे, आणि पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करणे, इत्यादी प्रकारे दडपशाही करण्याचा प्रकार सरकार आणि पोलीस यंत्रणा करीत आहेत. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे.                 या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. नाशिक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 'फिजिकल डिस्टनसिंग'चे पालन करीत आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्याच दिवशी पुण्यात चिनी मालाच्या विरोधात ब्राह्मण संघटनेच्या लोकांनी 'फिजिकल डिस्टनसिंग' न पाळता केलेल्या आंदोलनात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सोलापुर मध

हल्लापीडित पत्रकार न्यायाच्या प्रतिक्षेत!पोलीस अधिक्षकांची घेतली भेट; संरक्षण देण्याची मागणी

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळीतील  तीन पत्रकारांवर मागील काळात जीवघेणे हल्ले झाले असून एका प्रकरणाचा तपास तीन महिने होऊनही पूर्ण नाही तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटून आले आहेत. अद्यापही ते जखमी पत्रकार आणि कुटुंबातील सदस्यांच्या मागावर असल्याने धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्या घेऊन आज हल्लाग्रस्त पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली. या भेटीत ओढवलेल्या सर्व परिस्थिची कैफियत मांडून आमचे व आमच्या कुटुंबियांचे संरक्षण करा अशी मागणी केली. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटले. निवेदन देऊन हल्लाग्रस्त पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची कैफियत मंडली. ज्यात म्हटले आहे की, 20 मार्च 2020 रोजी दि कोरोमंडल किंग सिमेंट कंपनी (धर्मापुरी रोड, परळी वै) च्या प्रवेशद्वारावर पत्रकार दत्तात्रय काळे, महादेव शिंदे व संभाजी मुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये महादेव शिंदे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चरसुद्धा झाले. सदरील घटनेच्या तापासबाबत अद्याप आम्ही समाधानी नसून ती

परळीच्या नेहा जगतकर ची तेलंगणात भरारी

Image
बीड (प्रतिनिधी) -: तेलंगाना स्टेट बोर्ड येथील एस.एफ.एस. हायस्कूल. शांतीनगर हैदराबाद, परळीच्या कु. नेहा बालाजी जगतकर राहणार जगतकर गल्ली,परळी जिल्हा बीड. हिने 10 पैकी 9.5 गुण घेऊन म्हणजेच (10/9.5) CGPA घवघवीत यश मिळविले आहे, एस.एफ. एस. हायस्कूल मधून गुणवंत म्हणून बहुमान प्राप्त केला आहे. कु. नेहा बालाजी जगतकर हिने  परळीचे नाव हैदराबाद तेलंगणा राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, परळी व बीड येथील रहिवासी असलेले संपादक पत्रकार बालाजी जगतकर व तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर यांची कन्या आहेत, कु. नेहा हिने  तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील शांतीनगर एस.एफ.एस. हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. तिने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. 10 पैकी 9.5 पैकी म्हणजेच (10/9.5) CGPA गुण घेऊन यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी निदर्शने

Image
  परळी(प्रतिनिधी) -: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस  कमिटीचे अध्यक्ष ना बाळासाहेब थोरात संपर्कमंत्री ना अशोकराव चव्हाण  उपाध्यक्ष रजनीताई पाटील यांच्या  आदेशावरून परळी तहसील कार्यालयावर  केंद्र सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बी बियाणे बोगस खते औषधी इत्यादी मागण्या च्या पाठपुराव्यासाठी परळी तहसील कार्यालय समोर दि30  जून 2020  वेळ  11 ते  1 च्या दरम्यान तहसील कार्यालयासमोर  निदर्शने  काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहेत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ केली आहे ती मागे घेण्यात यावी व शेतकऱ्यांना बोगस  खते बी-बियाणे औषधी देणाऱ्या  कंपन्याचे  परवाने रद्द करण्यात यावेत या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या  कार्यक्रमास काँग्रेस चे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा कोरे प्रकाश देशमुख जीएस सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन कार्यक्रम होणार आहे 11ते 1 च्या दरम्यान काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण

पुरोगामी पञकार संघाने " कोरोना योध्दा :" म्हणून अमर रोडे यांना सन्मानित

Image
बीड (प्रतिनिधी) -: जिल्हातील परळी  तालूकातील महाराष्ट्राचे लक्ष वेध घेणारी म्हणजे परळी नगर पालीका होय.  नेहमीचीच वेग-वेगळ्या चर्चाला सामाजिकता असो किंवा राजकारणाची चर्चा असो दोन्ही विषयावर परळी नगर पालिका नंबर एक असते. आज कोरोना कोविड-19 च्या संसर्गजन्यनांच्या बाबत ही तसेच बीड जिल्हात तीन्ही लॉकडाऊन झाले एक ही  कोरोना रुग्ण सापलेला नव्हता. बीड जिल्हाचे जिल्हाधिका-यांकडून अतिशय कडेकोठ बंदोबस्त शहरा-शहरात प्रशासनानाने तंतोतंतपणे पालन केले. होते .      बीड जिल्हातील परळी तालूकात चौथा लॉकडाऊनच्या दरम्यान बहुतांश कोरोना रुग्णांची संख्याने वाढ झाली. जिल्हातील नागरिकांना भीती निर्माण  झाली. त्यावर मात करण्यासाठी परळीच्या नगर-पालिकाने प्रभाग सुरक्षा समिती स्थापना सदस्यांकडून काम करुन घेण्यासाठी वेग-वेगळे प्रभाग नियुक्ती केली  तसेच वेग-वेगळ्या गल्ली-गल्लीतील तरुणांचा एकमेव काम करण्यासाठी श्री अमर सोपान  रोडे यांना सदस्य म्हणून  यांनी प्रभाग सुरक्षा एक व दोन पाहणी व जबाबदारी सोपविलेली होती . नगर-पालिकाचे कर्मचाऱ्यांकडून व  पोलीसांकडून मदत घेवून शहरात कडेकोठ बंदोबस्त करण्यासाठी सर्वञ

जेष्ठ सामाजिक नेते भानुदास देवरवाडे "रामचंद्रजी इंगळे समाजसेवा पुरस्काराने" सन्मानित

Image
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- येथील  आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठ आधारस्तंभ तथा माजी जि. प.सदस्य बीड  कालकथित मा. रामचंद्र इंगळे (आप्पा) भारजकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा  मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार  ज्येष्ठ सामाजिक नेते  मा.भानुदास  नामदेव  देवरवाडे ,(देवळा)यांना  मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह देऊन  रविवार दि.28 जुन 2020 रोजी  रामचंद्रजी  इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव बालासाहेब इंगळे,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.रमेश इंगोले,आयु.केवळबाई इंगळे, माजी तहसीलदार नामदेवराव इंगळे,जयश्री शिररसाट, राजेंद्र इंगळे,ब्रिजेश इंगळे ,डॉ. भारती इंगळे ,स्वीतम इंगळे,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्राचे शब्दांकन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी केले. हा पुरस्कार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील  सामाजिक योगदान  असणाऱ्या,  निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तीस  व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान ,अंबाजोगाई जि.बीड

धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या वतीने मा.आ.डाँ.रत्नाकररावजी गुट्टे यांना विविध मागणीचे निवेदन.

Image
गंगाखेड (प्रतिनिधी) -: गंगाखेड नगर परिषद यांच्या मार्फत शहरातील रमाई आवास घरकुल योजना (नागरी)सन.२०२० पात्र लाभार्थी यांना मंजुर झालेल्या २५८ पात्र लाभार्थी यांना तात्काळ घरकुल वाटप करावे व शासनातर्फ देण्यात येणा-या २,५०,०००(दोन लाख पन्नास हजार) एेवजी प्रती लाभार्थी ३०००००(तिन लाख रुपये )५०,००० (पन्नास हजार रुपये) वाढीव देण्यात यावे.आणि लाँकडाऊन काळातील शहरातील नागरीकांचे विज बिल माफ करावे असे मागणीचे निवेदन गंगाखेडचे आमदार डाँ.रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांना धम्मज्योत धम्मप्रसारक मंडळ,क्रांतीभुमी युवा प्रतिष्ठान,गंगाखेड यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी मा.सुरेशभाऊ साळवे,बाळासाहेब जंगले,राहुल गायकवाड,राजाचंद्रसेन जंगले,उमाकांत हेंडगे,नवनाथ साळवे,लक्ष्मण साबणे,अनंत उजगरे,महादेव व्हावळे,अँड.मिलींद क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मौजे लिंबुटा येथे "सादग्राम "ची बैठक ; वृक्ष रोपांची लागवड करण्याचा निर्णय

Image
परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे आज रविवार, दि.२६ जून रोजी सकाळी१०.वा.श्री हरीकृपा  सार्वजनिक वाचनालयात सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा या समितीची बैठक घेण्यात आली. वृक्ष लागवड हा या बैठकीचा मुख्य विषय होता.  स्मशान भूमित  तारेचे कंपाउंड किंवा वृक्ष संरक्षक जाळ्यांची व्यवस्था करणं शक्य होत असेल तर यावर्षी सुमारे २०० वृक्षारोपांची लागवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पुढच्या रविवारी ग्रामस्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी अधिकाधिक सहभाग घेऊन   व कोरोनाशी संबधित शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करून ग्रामस्वच्छता करण्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. गतवर्षी ग्रामपंचायत व सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावर वड,पिंपळ, गुलमोहर,चिंच,आवळा,लिंब,करंज,अशी १००  वृक्षरोपांची लागवड करण्यात आली होती.त्यांचे आता जवळपास वृक्षात रूपांतर झाले आहे. बैठकीस सरपंच सुदाम यशवंतराव मुंडे ,सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती सदस्य बळीराम सोमेश्वर मुंडे, ,सल्लागार रामदास  साहेबराव दिवटे(नाना),रमेश महारूद्र मुंडे,गोपाळ रामराव अघा

परळीच्या मुलीची बारावी परिक्षेत तेलंगणा राज्यात उत्तुंग भरारी दिव्या महादेव नंदिकोले हिचे सर्वत्र कौतुक

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -:   एच.एस.सी बोर्ड परीक्षेत तेलंगना राज्यातील  हैदराबाद येथील आयडियल कॉलेज येथे परळीच्या दिव्या महादेव नंदिकोले रा.विद्यानगर याने 470 पैकी 461 गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. आयिडयल कॉलेजमधून ती सर्वप्रथम येण्याचा बहुमानही तिने प्राप्त केला आहे. कु.दिव्या नंदिकोले हिने परळीचे नाव हैद्राबाद (तेलंगणा) राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. येथील विद्यानगर भागातील रहिवाशी असलेले महादेव दत्तात्रय नंदिकोले यांची मुलगी कु.दिव्या हिने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील दिलसुखनगर येथे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती. तिने या परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. इयत्ता बारावीत तिने 470 पैकी 461 गुण घेवून यश संपादन केले आहे. इंग्रजी विषयात तिला 95, गणित 73, फिजीक्स 60, संस्कृत 99, गणित भाग 2 मध्ये 75 तर केमिस्ट्री विषयात 59 गुण मिळविले आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

परळी तालुक्यातील नागदरा येथे न उगवलेल्या सोयबीनच्या बियाण्याचे कृषी विभागच्या वतीने पंचनामा

Image
परळी वै.( प्रतिनिधी) :-  जुन महिन्याच्या सुमारास पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी सुरुवात केली. परंतु पेरलेले सोयबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. आज नागदरा शिवारात कृषी विभागाच्या वतीने न उगवलेल्या सोयबिनचे स्पाँट पाहणी करून पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शेतकरी सोपान मुंडे यांच्या शेतात पाहणी करतांना गेवराई येथील कुषी आधिकारी मुंडे, कुषी सहायक सांगळे, पैठनकर यांनी शेतकरयाचा बाधावर जाऊन पंचनामा केला यावेळी शेतकरी उपस्थित होते.       खरीप हंगामात मृग नक्षत्राच्या सुरवातीला परळी तालुक्यात  समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. मागच्या वर्षी पाऊसाने सोयाबिन खराब झाल्या मुळे तो पेरणीस योग्य नसल्याने शेतकऱ्यांनी बाजारातून चांगल्या कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. परंतु सोयबिनचे बियाणे उगवलेच नाही परळी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचे 90 टक्के बियाणे उगवलेच नाही. तालुक्यातील नागदरा येथील शेतकऱ्यांनाही सोयबिन न उगवलेल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे. कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्

कु. निकीता जगतकर आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याचे धनंजय मुंडेंचे पोलिसांना निर्देश जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून केले सांत्वन, आर्थिक मदतीसाठी समाज कल्याण विभागालाही दिले निर्देश

Image
परळी (प्रतिनिधी) - : कु. निकिता जगतकरच्या  आत्महत्या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांना तातडीने आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समाज कल्याण विभागामार्फत तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचेही निर्देश ना. मुंडे यांनी दिले आहेत. ना. मुंडे हे होम क्वारंटाईन असतानाही या प्रकरणाची दखल घेत त्यांचे सहकारी प्रतिनिधी डॉ. विनोद जगतकर यांच्या माध्यमातून ना. मुंडेंनी जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून संवाद साधत सांत्वन केले. यावेळी ना. मुंडे यांनी आपण जगतकर कुटुंबियांच्या पाठीशी असून कु. निकिताच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी असे निर्देश बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील दु:खीत जगतकर कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत जिल्हा समाज कल्याण विभागालाही निर्देश दिले आहेत. निकीताच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निकीताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी दिले आहे.

युवक नेते प्रविण कांदे यांनी वाढदिवसानिमित्त केले 101 रोपांचे वृक्षारोपन

Image
परळी (प्रतिनिधी) -: प्रविण  कांदे रा.जिरेवाडी यांनी वाढदिवसानिमित्त अवांतर खर्चाला फाटा देत श्री सोमेश्वर मंदिर परिसरात आज 101 रोपांचे वृक्षारोपन केले.  जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिरात सरपंच प्रा.गोवर्धन कांदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि तरूणांच्या उपस्थितीत प्रविण कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. सोमेश्वर मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. 

निकिता जगतकर आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या - बाबुराव पोटभरे

Image
परळी (प्रतिनिधी) -: एकतर्फी प्रेमातून सतत च्या छळास कंटाळून शहरातील निकिता जगतकर ने आत्महत्या करून आपले जीवन संपविले. बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी आज मयत निकिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी मगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दत्ता सावंत, अनंत इंगळे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हेही उपस्थित होते.           शहरातील भीमनगर (जगतकर गल्ली) येथील निकिता जगतकर या तरुणीने एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपी उस्मान शेख याला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज दि.२७ रोजी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी मगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी मयत न

परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कन्टेनमेंट झोन शिथील - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Image
बीड, (प्रतिनिधी) दि.२६ :- परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९)रुग्ण  पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती.  शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे. यामुळे परळी शहरातील माधवबाग-शारदा नगरचा भगवान बाबा चौक अश्रुबा मुंडे यांचे टी हाऊस पर्यंतचा भाग येथील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.  जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

निर्सगाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण सोबत वृक्ष संवर्धन गरजेचे-सरपंच डी.एस.राठोड

Image
परळी वै.(प्रतिनिधी) :- पर्यावरण समतोल बिघडल्याने प्रत्येकाने गावोगावी वृक्ष लागवड करण्यासोबतच वृक्षसंवर्धन करणे निंतांत गरजेचे आहे यामध्ये सर्व सहभाग महत्त्वाचा आहे. तालुक्यातील सर्व गावांच्या नागरिकांनी पाच तरी वृक्ष लागवड करून निर्सगाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण सोबत वृक्ष संवर्धन करणे गरजेचे बनले असल्याचे आवाहन लमाणतंडा ग्रामपंचायत सरपंच डी.एस.राठोड यांनी नंदागौळ रोडवरील वसंतनगर वनविभागाच्या घनवृक्ष लागवडीस सदिच्छ भेट दिली त्यावेळी केले. यावेळी वनरक्षक वैजनाथ दौंड यांनी सर्व घनदाट वृक्ष लागवडीची माहिती दिली.          परळी तालुक्यातील वसंतनगर येथील डोंगराच्या माथ्यावरील वनविभागाच्या घनदाट वृक्ष लागवडीस सरपंच डी.एस.राठोड यांनी बुधवार, दि.24 जुन 2020 रोजी सदिच्छा भेट दिली. कोरोनाच्या संकट काळातील टाळेबंदीत वनविभागाने जोपासना केलेली वृक्ष आज दहा ते बारा फुटांचे जोपासना केली आहे. वनविभागाने अथक परिश्रम घेऊन दहा महिन्यात अशी घनदाट वृक्षांचे जंगल तैयार केले आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सरपंच राठोड यांनी मनापासून कौतुक केले.  परळी जवळील वनविभागानेडोंगरमाथ्यांनी व्य

बीड येथे शाहू महाराज यांची जयंती साजरी

Image
बीड (प्रतिनिधी) -: रयतेचे राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मल्टीपर्पस ग्राउंड बीड  येथील पुतळ्यास पुष्पहार घाळून विनम्र अभिवादन करते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभा उमेदवार उमेदवार अशोक हिंगे, बबन वडमारे, शेक युनुस, अजय सरवदे, ज्ञानेश्वर कवटेकर राजु कवटेकर, बालाजी जगतकरआदी दिसत आहे

आज सिरसाळा येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कोरोना योध्दा पुरस्कारांने महिला व पुरुषांना सन्मानित

Image
बीड [ प्रतिनिधी ] -: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे ग्रामीण भागामध्ये नुकत्याच पुरोगामी पत्रकार संघाकडून शाखा स्थापन करण्यात आलेली होती या ग्रामीण सिरसाळा  तरी आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी सिरसाळा येथील आयोजित केले गेले सिरसाळा येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात  आरोग्य अधिकारी ,  परिचारिका , सेवक,  कर्मचारी असे अनेकांना पुरोगामी पञकार संघाच्यावतीने त्यांना कोरोना कोविड-19  कोरोना योद्धा  म्हणून सन्मानित करण्यात आले .आज ज्या महिलांनी या जगामध्ये कोरोनाचे हाहाकार व संसर्जन एक वाढत आरोग्य विभागाकडून यांचे परिपुर्ण कर्मचाऱ्यांकडून  प्रथम लक्ष दिले गे.  महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विष्णानूजन्य व संसर्गजन्यनांच्या  वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंधक उपाय आरोग्य विभागाकडून सर्वच कर्मचाऱ्यांनी  लक्ष दिल्यामुळे  डॉक्टर , नर्सेस,  सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये कोरोना  ग्रस्त परिसरातील प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांनी काम केले याच पार्श्वभूमीवर आरोग्य खाते नगरपालिका तहसील कार्यालय पोलीस  प्रशासन वेगळा विभागामध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी कर

माजी सैनिक अनुरथ वीर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी द्यावी.महाराष्ट्राचे राज्यपाल देतील का? माजी सैनिकांना संधीबीडचा माजी सैनिक उतरला आमदारकीच्या आखाड्यात

Image
बीड (प्रतिनिधी) -: बीड तालुक्याचे भूषण, समाजसेवक, माजी सैनिक अनुरोध वीर यांनी  भारतमातेच्या सेवेसाठी गेली ‌(21)‌एकवीस वर्षे अहोरात्र आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी यांनी अनेक मोठ्या कारवाया जम्मू-काश्मीर सारख्या अति संवेदनशील क्षेत्रामध्ये पार पाडले आहे, अनेक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले आहे, सैनिकांच्या अनेक व आवश्यक प्रश्नांना आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्राच्या सभागृहांमध्ये असा एखादा माजी सैनिक असणे खूप आवश्यक आहे. म्हणून अनुरथ वीर यांना राज्यपाल कोटातून आमदार म्हणून निवडने खूप गरजेचे आहे, बीड तालुका जिल्हा राज्यात जनसेवा करण्याचा वसा त्यांनी अंगीकृत केलेला आहे. देशाची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना त्यांनी केला आहे बॉर्डर वरच्या सैनिकांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत त्या त्यांनी त्यांच्या 21 वर्षाच्या कार्यकाळात मध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवले आहेत त्या सोडविण्यासाठी या अनुभवी व्यक्तींना महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये निश्चितपणे सहभागी करून घेणे शासनाच्या व प्रशासनाच्या फायद्याची ठरला असं वाटतं. ते निवृत्त झाल्या पासून मुक्काम पोस्ट पा

सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांचा वाढदिवस साजरा

Image
परळी (प्रतिनिधी) -: सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र अनंत इंगळे यांचा वाढदिवस साजरा करताना कॉन्ट्रॅक्टर रमेश सरवदे, सचिन रोडे, राहुल घोबाळे, बिंदुसार रोडे,संजय गवळी, विकास रोडे, नवनाथ दाने,बनसोडे सर, गौतम रोडे, सुगद मस्के, आकाश सावंत दिसत आहेत

महाराष्ट्रात 40 हजार मेट्रिक टन सोयाबीनचे बोगस बियाणे - वसंत मुंडे

Image
परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे  बियाणे न उगवण्याच्या तक्रारी  कृषी खात्याकडे शेतकरी करीत आहेत यामध्ये सर्व  बी बियाणे  पुरवणाऱ्या  कंपन्यांना  राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांचे काहीच वाकडे होत नाही असा त्यांचा भ्रम आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे मध्यप्रदेश मधून 40 हजार मेट्रिक टन सोयाबीनचे बी बियाणे बाजारपेठेतून खरेदी करून बोगस बियाणे सर्व कंपन्यांनी वेगवेगळ्या पिशव्या भरून महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ते बियाणे विक्रेत्याच्या माध्यमातून विकीत आहेत यामध्ये राज्य कृषी गुणनियंत्रण विभाग यांचे सर्व दूरलक्ष असून बनावट खते व औषधे ही प्रकरणे खूप मोठ्या  निविष्ठांची गुणवत्ता तपासणी आयुक्त कार्यालयाकडून एस ए ओ जे डी ए डायरेक्टर आयुक्त कार्यालयाकडील संपूर्ण जॉब दिले असते खते बियाणे कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासून प्रमाणित अप्रमाणित रिपोर्ट देणे बंधनकारक असते निरक्षक सहसंचालक गुणवत्ता निरीक्षक राज्याचा मुख्य गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांच्यामार्फत प्रयोगशाळेत खते बी-बियाणे औषधी ची वर

निकिता जगतकर च्या आत्महत्येने परळीत खळबळपोलीस तपास यंत्रणेकडे लक्ष !

Image
बीड (प्रतिनिधी) -: परळी  येथील एका खासगी नर्सिंग विद्यालयाची विद्यार्थिनी कु. निकिता सखाराम जगतकर  वय (24) येथे 12 जून 2020 या दिवसी आपल्या दुपारच्या वेळी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सदरील आत्महत्या हा चर्चेचा विषय परळी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होता. परंतु निकिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी दुःखातून सावरून दिनांक 24 जून रोजी  न पोलिसांमध्ये जाऊन रीतसर तक्रार देऊन निकिताच्या मारेकऱ्यांना ,आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या मूलास शिक्षा व्हावी यासाठी तक्रार दाखल केली,  ज्या दिवशी निकिताने आत्महत्या केली. त्या दिवशी त्याच्या घरातील चुलत भावाचे लग्न हे सोनपेठ येथे होते. आई-वडीलांनी निकिताला लग्नाला सोबत चल म्हणून बोलले पण निकिताने लग्नात जाण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते असं दिसून येते, सकाळी आई-वडील लग्न साठी गावाला गेल्या नंतर दुपारच्या वेळेस घरी ज्यावेळेस परत आले व पाहिले त्यावेळेस निकिता घरातील पत्राच्या आडूला  लटकलेल्या स्थितीमध्ये  मृतावस्थेत दिसून आली. घरातील सर्वात छोटी लाडाची मुलगी म्हणून निकिता ओळखली जात होती.  उस्मान लतीफ

पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष-पदी श्री विजयकूमार वाव्हळ नवनिर्वाचीत युवा तरुण यांची सर्वानुमते निवड

Image
चौकट  " दै. जय महाभारत"   वृञमान पञ  सुरु केले, यावृञपञाच्या माध्यमातून राजकारणातील नेत्यांची भूमिका असो, की शासकिय आधिका-यांची भूमिका असो  बातमी रोख-ठोक भुमिका मांडणारे दै, जय महाभारत एक ज्वलंत वादळ  जिल्हातील "श्री. विजयकूमार वाव्हळ" मराठवाड्यात पञकारितेतील एक नवे महाभारताचे पर्व सुरु...! बीड (प्रतिनिधी) -: पुरोगामी पञकार संघाची मराठवाडातून  बीड जिल्हाच्या गेवराई शहराची दिशा बदणारे दै. जय महाभारतचे मुख्य-संपादक :  श्री विजयकुमार वाव्हळ  यांची मराठवाडाच्या उपाध्यक्ष-पदी निवड करण्यात आली. श्री. वाव्हळ  अनेक वर्षापासून बातम्या, लेख, मुलाखतीचे काम करत असल्यामुळे पञकार क्षैञामध्ये अनुभवानेची व पञकार हा समाजासाठी लेखणीच्या चौथा स्तंभ होय . तसेच जिल्हा व तालूक्यात असून हे कार्य पञकारितातेचे अभूतपूर्व काम करणारे नवनिर्वाचीत व तरुण श्री विजयकूमार वाव्हळ  नेतृत्वाची संघाला पुढे घेवून जातील त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी , बीड, उस्मानाबाद , नांदेड , लातूर जिल्ह्यातुन यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन होत आहे .       बीड जिल्ह्याच्या गेवराई तालूक्यातील एक लहान खेड्य

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले - प्रकाश आंबेडकर

Image
सोलापूर, (प्रतिनिधी) दि, २५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारत देशात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले जात आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.   कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.     कोरोना हा देशात इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेला जिवाणू आहे. ज्या कुटुंबात कोविडने बळी गेला असेल, त्या कुटुंबीयाने पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी लोकांना बंदी घालण्याऐवजी त्यांना परवानगी दिली. वास्तविक पाहता त्यांना मनाई करण्याची सूचना होती. तरीही त्यांना भारतात येऊ दिले. त्याचा फटका या देशाला बसला असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी के

परळी तालुका अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुका कार्यकारणी जाहीर

Image
परळी वै.(प्रतिनिधी) -: अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा ना नाना पटोले साहेब व मराठवाडा अध्यक्ष अँड माधव जाधव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा जी एस सौंदळे शेख सिकंदर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुका किसान काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये परळी तालुका अध्यक्ष  लहू दास तांदळे कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ ज्ञानोबा मुंडे चिटणीस रामभाऊ भदाडे उपाध्यक्ष उत्तम राव मुंडे उपाध्यक्ष रामलिंग नावंदे चिटणीस इत्यादींची नियुक्ती करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर परळी तालुक्यात किसान काँग्रेस काम करणार यामध्ये बी बियाणे खते औषधी भाववाढ बाजारपेठेतील चढ-उतार या सर्व प्रश्नांवर आवाज किसान काँग्रेस उठणार असे बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर  केला सूत्रसंचालन सय्यद आलताफ आभार रामलिंग नावंदे यांनी  मानले

परळी शहर काँग्रेस कार्यकारिणी जाहीर बाबुभाई नंबर दार

Image
परळी वै.( प्रतिनिधी) -: परळी शहर काँग्रेस कमिटीचे दिनांक 23/6/ 2020 ला सविस्तर काँग्रेस कार्यालयात मीटिंग घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा ना बाळासाहेब थोरात उपाध्यक्ष रजनीताई पाटील जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी बीड जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  खतीब  म आसेफोधीन वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार सचिव  डॉ सुरेश चौधरी बीड जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे  ब्रदर  केवी गायकवाड  उपाध्यक्ष  अनिल भाऊ अवचिते काँग्रेसचे नेते गणपत कोरे यांच्या सूचनेवरून परळी शहर काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये बाबुभाई नंबर दार अध्यक्ष विश्वनाथ गायकवाड कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ सरचिटणीस गुलाबराव देवकर उपाध्यक्ष सुदाम लोखंडे उपाध्यक्ष बाबुराव इंदुरकर कोषाध्यक्ष दत्तात्रय मुळे चिटणीस पांडुरंग सदरे चिटणीस शेख जावेद चिटणीस सलीम खान संघटक कार्यकारिणी सदस्य शेख महमूद फारुख भाई श्रीमती हलीना बी शेख जफर संजय गीते विजय देशमुख  शशीशेखर चौधरी राम घाटे रामलिंग आप्पा नावंदे भारत हाके रमेश काकडे सल्लागार वसंतराव मुंडे प्रा एस एल देशमुख गणपत कोरे

परळी बाजार समिती च्या बाजूस थाटला कचऱ्याचा बाजार मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात - प्रा.अतुल दुबे

Image
परळी (प्रतिनिधी) -: परळी  बाजार समिती च्या बाजूला ग्राउंड मध्ये प्लास्टिक कचरा पडलेल्या ठिकाणी अनेक गायी 6 वाजेनंतर उभे असल्याने सादर प्लास्टिक कचरा खात आहेत या आधी देखील गायीने प्लास्टिक कचरा खाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या बाबतीत वारंवार सुचना करून देखील नगरपरिषद चे काम वाऱ्यावर दिसून येत आहे सगळी  कडे स्वच्छतेचे गुणगान आणि मुख्य बाजार समिती बाजूला घाण कचऱ्याचा ढीग मुळे नागरिकांच्या आरोग्यासह  मुक्या जनावरांचे जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसुन येत आहे. आता तरी नगर परिषद या प्लास्टिक कचऱ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देतील का असा संतप्त सवाल शिवसेना,विध्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केला आहे. भारतात सर्वत्र कोरोना जे हाहाकार माजवला असून परळी नगर परीषद एकीकडे स्वच्छता अभियान चालवित आहेत तर दुसरीकडे स्वच्छता चे तीन तेरा नऊ आठरा वाजलेले दिसत आहे.मुक्या जनावरांच्या आणि परळीतील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या काम चुकार करणाऱ्या व स्वच्छता विषयी खोटे बोलून वाजागाजा करणाऱ्या स्वछता टीम व नगरपरिषद ने त्वरित पाहणी करावी प्लास्टिक बंदी असतानाही नुसते नावालाच कार्यवाही द

खा.शरद पवार यांच्यावर टिका करण्याची पडळकरांची लायकी नाही –चंदुलाल बियाणी

Image
परळी (प्रतिनिधी) -: वयाच्या  ८० व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार तरूणालाही लाजवतील एवढ्या उमेदीने काम करीत असून, त्यांच्या राजकीय उंचीची बरोबरी करण्याची किंचितही पात्रता आ.गोपीचंद पडळकर यांची नाही अशी जळजळीत टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न.प.सदस्य, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी केली आहे. खा.शरद पवार यांच्यावर आ.पडळकर यांनी केलेल्या टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी खरपुस समाचार घेतला. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर पडळकर भाजपकडून आमदार झाले. नव्यानेच आमदार झाल्याने त्यांचा तोल गेला असून, तोंडही चांगलेच फुटले आहे. खा.शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी व सार्वजनिक प्रश्नांवर आपले उभे आयुष्य पणाला लावले आहे. आजही राज्यात कोठोही संकट आले तर शरद पवार आणि शरद पवारच घटनास्थळी धाव घेतात. राज्याच्या राजकारण आणि समाजकारणाचा पडळकरांना अभ्यास नसल्याने त्यांनी टिका करण्यापेक्षा शरद पवार यांच्या नेतृत्वाचा मनापासून अभ्यास करावा आणि मगच टिका करावी असा सणसणीत सल्लाही बियाणी यांन

एसटी आरक्षणात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुफडासाफ गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल -सखाराम बोबडे पडेगावकर

Image
एसटी आरक्षणात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुफडासाफ गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल -सखाराम बोबडे पडेगावकर गंगाखेड (प्रतिनिधी) -: 70 वर्षे सत्तेत असूनही धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा एसटी आरक्षणाचा प्रश्न न सोडवता त्यात खोडा घालणाऱ्या कोरोनाचा सुपडा साफ करण्याचे काम गोपीचंद पडळकर नावाच सॅनीटायझर करेल असा विश्वास धनगर साम्राज्य सेनेचे चे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी केला आहे.  गोपीचंद पडळकर यांच्या पंढरपूर मधील पत्रकार परिषदेतील वक्तव्याच सखाराम बोबडे पडेगावकरां नी समर्थन केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की बहुजन  समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी ज्यांना कोरोना संबोधले  त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आत्मचिंतन करून पाहावं. स्वातंत्र्यापासून दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेल्या एसटी आरक्षणाचा मुद्दा गुंतागतीचा करण्याचं  काम या कोरोना राजकारण्यांनी केलंय. स्वतःच्या स्वार्थासाठी या कोरोना  रूपी राजकारण्यांनी महाराष्ट्रातील उपेक्षित  समाजाच्या घरात घरात भांडण लावण्याचे काम केलं.  महाराष्ट्रातल्या पाच-पन्नास

परळीत राष्ट्रवादीकडून आ. पडळकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेधपडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Image
परळी (प्रतिनिधी) -: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वैचारिक दिवाळखोरी दाखवणाऱ्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे, परळीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आ. पडळकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे परळी राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे. एका गाढवाच्या गळ्यात 'मी गोपीचंद पडळकर' असा फलक लावून कार्यकर्त्यांनी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.  दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत 'सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका' असे म्हटले आहे. राजकारणात नेम अँड फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची, झटपट प्रसिद्धी मिळते, असं समजून अनेकजण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' अशा उचापती करत असतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा डिपॉझिट आणि अस्तित्व टिकुन राहील, देवादिक

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
बीड,(प्रतिनिधी) दि.२४:- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९अंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील संगणकीय पावतीमध्ये "आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार  तहसिलदारकडे वर्ग करण्यात आली आहे" असा शेरा नमूद असलेल्या अशा शेतक-यांनी त्यांचे आधार कार्ड,बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र इत्यादीसह संबंधित तहसिलदार यांच्याकडील तालुकास्तरीय समितीकडे हजर होऊन आपल्या ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन शिवाजी बढे,  जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.  यानंतर पात्र लाभार्थ्यांची रक्कम त्यांचे खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठी  तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त असलेल्या  तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयास ऑनलाईन उपलब्ध असून सदरील यादया संबंधित तहसिल कार्यालय, सहायक निबंधक,सहकारी संस्था कार्यालय व संबंधित बॅंक शाखेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहेत. शासनाचे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पोर्टलवर ज्या शेतक-यांची नावे  पात्र लाभ

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अपुऱ्या सुविधांमुळे,वंचितनेअधिकाऱ्यांना धरले धारेवर

Image
कल्याण,(प्रतिनिधी) दि.२४ -: अपुऱ्या सुविधांमुळे कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुक्मिणी रुग्णालयात वेंटिलेटर व बेडची संख्या वाढवावी, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वाढ तयार करण्यात यावा, टेस्ट लॅबची संख्या वाढविण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे विभागाच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.   कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्याच्या गैरसोयींमुळे सामान्य व्यक्तींचे अतोनात हाल होत आहे. कल्याणच्या रुक्मिणी रूग्णालयात व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्यात यावे, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करावा. कोविडच्या टेस्टसाठी लॅब वाढवाव्यात.  पालिका रुग्णालयात कर्मचारी व  रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष माया कांबळे, नितीन व

अशोक नगर भागातील सिमेंट रस्ते, नाल्याची कामे करण्याची निवेदनातून मागणी

Image
परळी (प्रतिनिधी) -: परळी येथे अशोक नगर  भागातील रोडवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.भागातील नागरिकांनी एकञ येऊन   दि.२२/रोजी परळी नगर परिषदेला निवेदनाद्वारे सिमेंट रस्ता व नाली व स्वच्छतेसाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.     भागांमध्ये गेली अनेक वर्ष रोड चे कामे झाले नसून पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये नागरिकांना रस्त्याच्या नाल्याच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या घरासमोर पावसाच्या पाण्याचा ढव साचत आहे यामुळे आपापसात भांडण तंटे होता आहेत.   सध्याच्या पावसाच्या पाण्याचा ढव चिखल कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.  भागातील नागरिकांना कामाला जाता व येता वेळी पाण्याच्या ढवातून व चिखलातून येणे-जाणे करावे लागत आहे. व तसेच या भागातील महिलांना पाणी भरण्यासाठी व सार्वजनिक सौचालय ला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.   परळी नगरपरिषदेला  सम्राट अशोक नगर मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले परळी नगरपरिषदेने व संबंधितांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी सम्राट अशोक नगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आह

परळी नगरपालिकेने रमाई घरकुल योजनेतील मंजूर लाभारथिस पाच बरास वाळु, विधुत मिटर,व गॅस कनेक्शन देण्यात यावे - बालासाहेब जगतकर

Image
परळी (प्रतिनिधी) -: परळी नगरपालिकेने मंजुर लाभारथिस पाच बरास वाळु,विधुत मिटर व गॅस कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा  तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.                           याबाबत सविस्तर माहिती अशी कि शासनाने मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या स्तर उचावणयासाठि व त्यांच्या निवारयाचा प्रश्न सुठावा म्हणुन रमाई घरकुल योजनेतील मंजूर लाभारथिस शासनानेच घरकुल बांधण्यासाठी रास्त भावात पाच बरास वाळु देणे तसेच घरकुल पुर्ण झाल्यास घरात विधुत मिटर बसवून देणे व घरात धुर होऊ नये म्हणुन गॅस कनेक्शन देणे येवढे असताना देखील आतापर्यंत कुठलेही साधणे दिले नाहीत.तसेच ज्यांची  घरकुल मंजुर असुन ज्यांचे धनादेश तयार आहेत त्यांनाही एक लाखाचा धनादेश देण्यात यावे.  यासाठी लवकरात लवकर वरील साहित्य पुरवठा करण्यात यावे अशी लेखी मागणी येथील मुख्याधिकारी नगर परीषद परळी,तहसीलदार साहेब,जिल्हाधिकारी साहेब,व समाज कल्याण आयुक्त बीड ईतयादिना शासन आदेशाच्या प्रति सह निवेदने दिली असुन त्याची लवकरात लवकर